नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीजफायरचं झाल्याची माहिती येत आहे. पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला आहे की, पाकच्या सीजफायर उल्लंघननंतर भारताने दिलेल्या प्रत्यूत्तरामध्ये पाकिस्तानचे २ सैनिक मारले गेले आहे.


पाकिस्तानातील वर्तमानपत्र डॉनच्या माहितीनुसार रात्री २.३० वाजचा फायरिंग सुरु झाली. सकाळी ८.०० वाजेपर्यंत ही फायरिंग सुरु होती. परराष्ट्र सचिवांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली की, लष्कराने काल सर्जिकल ऑपरेशन केलं. २० वेळा भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न झाला. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.'