श्रीनगर : दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंपोरे येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताचे तीन जवान शहीद झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले सुरुच आहेत.


भारताने पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तसेच हल्ले केले जात आहेत.