नवी दिल्ली : महाराष्ट्रातील हवाई मार्गानं एकमेकांपासून १ तासाच्या अंतरावर असणाऱ्या शहरांमध्ये लवकरच विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यात कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, नाशिक ही शहर मुंबई, पुणे आणि नागपूरशी हवाई सेवेनं जोडली जातील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय नागरी विमान मंत्री अशोक गजपती राजू यांच्या नेतृत्वात आज केंद्र सरकारची नवी उडान योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये एक तासाचा हवाई प्रवास करता येणार आहे.