श्रीनगर : उरीमधल्या हल्ल्याची पाकिस्तानाला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी भारतानं पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घूसून दहशतवाद्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्याची तयारी सूरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या सर्वोच्च स्तरावर याविषयी कालपासूनच चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी दहशतवादी छावण्या उद्धस्त करण्याच्या पर्यायांविषयी चर्चा केली. आज यासंदर्भात पंतप्रधानांसमोरही याविषयीचं सादरीकरण स्वतः दोवाल हे करणार असल्याची शक्यता आहे.