नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षाच्या शेवटच्या मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधला. मोदींनी 'मन की बात' मधून देशवासीयांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही यावर्षातली शेवटची आणि 27वी मन की बात होती. देशात खळबळ उडवून देणा-या नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींनी दुस-यांदा नोटाबंदीच्या विषयावर जनतेशी संवाद साधला.


मोदींनी यावेळी ग्राहक आणि व्यापा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांचा उल्लेख आपल्या मन की बात मधून केला. यावेळी त्यांनी जनतेला कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देण्याचं आवाहन केलं.