श्रीनगर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने मॉर्टर आणि स्वयंचलित शस्त्रांच्या सहाय्याने जोरदार मारा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोळीबारात 2 भारतीय नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. पाकिस्तानच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झालेत. 


सकाळी सव्वासात वाजल्यापासून पाकिस्तानकडून छोटी शस्त्र, स्वयंचलित बंदुकांसह 82 एमएम आणि 120 एमएम उखळी तोफांचा मारा करण्यात आला. 


एलओसीजवळच्या गावांमधल्या जवळपास 100 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. जानगढ, भावानी, लाम या पट्ट्यात पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात मारा करण्यात येत आहे. पाकिस्तानने कालही केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान जखमी झाला.