नवी दिल्ली : केंद्र सरकारनं रब्बी बियाणे खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडील पाचशेची नोट ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या निर्णयामुळे रब्बीच्या खोळंबलेल्या पेरण्यांना मोठा हातभार लागणार आहे. सरकारी बियाणे महामंडळांच्या दुकानांमधून वैध ओळखपत्र दाखवून शेतकऱ्यांना पाचशेच्या जुन्या नोटेचे व्यवहार करता येईल. 


नोटाबंदींच्या निर्णयानंतर यंदा बियाण्याअभावी रब्बीचा हंगाम हातचा जातो की काय अशी चिंता व्यक्त होऊ लागली होती.