नवी दिल्ली : भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानात ट्विटरवर चक दे इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड करतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या या कारवाईनंतर ट्विटरवर जोरदार टिवटिव सुरु आहे. चक दे इंडिया हा हॅशटॅग जबरदस्त ट्विट होतोय. हजारो लोकांनी हा हॅशटॅग ट्विट केलाय.


भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्याची माहिती दिली. 


उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही अभिनंदन केले जात आहे.