नवी दिल्ली : डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत  बदलणार नाही असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारवरची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्य सरकारनं परवाने मुंबई पोलिस कायद्यात बदल करून परवाने जारी करण्यास सांगितलं. 


पण सरकारानं परवाना देण्यासाठी घातलेल्या निर्बंधांविरोधात डान्स बार मालक पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारनं घातलेल्या अटींविषयी एक मार्च पर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितलंय.