नवी दिल्ली :  सुमारे ९ हजार कोटींचे बँकांचे कर्जबुडवून ब्रिटनमध्ये परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटन भारताकडे सोपवण्याला मंजुरी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने भारताची प्रत्यार्पणाची विनंती मान्य केली असून त्या संदर्भातील पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळविले आहे. 


सुमारे ९ हजार कोटींपेक्षा अधिकचे बँकांचे कर्ज बुडवून  मद्यसम्राट २ मार्च  २०१६ रोजी परदेशात पळून गेला होता.