गांधीनगर : भारताच्या तटरक्षक दलाने ५ जहाजांवरील २६ लोकांना अटक केली आहे. 


गुजरातमधील जखाऊमध्ये भारताच्या क्षेत्रात आलेल्या या ५ बोटी भारतीय सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतल्या आहेत. या बोटींमधील २६ लोकांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. या बोटी पाकिस्तानातून आल्या असल्याचा संशय आहे.