भोपाळ : मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी विधानसभेत अजब दावा केला आहे.  पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही, तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं मंत्रिमहोदयांनी म्हटलंय.भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूपेंद्र सिंह म्हणाले, मध्यप्रदेशातील काही ग्रामीण भागात भूत उतरविले जाते. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आमदारांना गोंधळ सुरूच ठेवला. अखेर, विधानसभा अध्यक्षांना काही काळासाठी कामकाज स्थगित केले.


मध्यप्रदेशात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधानसभेत कॉंग्रेसचे आमदार शैलेंद्र पटेल यांनी शेतकरी आत्महत्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता.