श्रीनगर : काश्मीर... भारताचं नंदनवन... पृथ्वीवर जणू स्वर्ग अवतरलेला नितांत सुंदर प्रदेश... सध्या  हेच काश्मीर आता धुमसतंय. पद्धतशीरपणे भारताचे हितशत्रू काश्मीरला धुमसवत ठेवतायेत. मात्र आजही काश्मीर हा भारताचं अविभाज्य अंग आहे आणि काश्मीर भारताचंच अविभाज्य अंग राहणार याची ग्वाही, इथले देशभक्त देताहेत. पाकव्याप्त काश्मीर सीमेनजीकच्या गुरेज खोऱ्यातून हा ग्राऊंड रिपोर्ट...
 
पाकिस्ताननं बळकावलेल्या काश्मीरच्या भूभागाच्या अगदी जवळ उभं राहून पाकिस्तानला सत्य सांगण्यासाठी कमालीचं धैर्य लागतं. सतत धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये आजही देशप्रेमींची कमतरता नाही. यांच्या नसानसांत देशप्रेम ओतप्रोत भरलेलं आहे. येणाऱ्या पिढ्यांना गौरवशाली भारताची ओळख व्हावी हिच इच्छा आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या सीमेनजिक गुरेज या ठिकाणी उभं राहून भारताचं कोणीच काहीही वाकडं करु शकत नाही, असा विश्वास इथले नागरिक व्यक्त करत आहेत. हे देशभक्त हीच भारताची खरी ताकद आहे.