नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरु असलेल्या फायरिंगवर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे की, मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की, आपली सेना आणि जवान पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर देत आहेत. आपण दिवाळी साजरी करतोय कारण जवान सीमेवर रक्षा करतोय. आपल्या जवानांवर विश्वास ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचं मस्तक झुकू देणार नाही असं देखील राजनाथ सिंह पुढे म्हणाले. पाकिस्तानच्या सैन्याला उत्तर दिलं जाईल. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच आहे. या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपूत्र जवान नितीन सुभाष शहीद झाले आहे.


शुक्रवारी रात्री देखील एलओसीवर कुपवाडाच्या माछिल सेक्टरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. त्यानंतर दहशतवादी पाकिस्तानकडे पळून गेले.