नवी दिल्ली : गेल्या 29 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर आज भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं जबरदस्त गोळीबार करत केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी सेनेच्या चार महत्त्वपूर्ण चौक्या उद्ध्वस्त केल्या. आज केलेली कारवाई पाकिस्तानविरुद्ध सर्वात आक्रमक कारवाई ठरलीय. 


या त्याच चौक्या आहेत ज्यातून पाकिस्तानी सेनेनं दहशतवाद्यांना संरक्षण फायर दिलं. या दहशतवाद्यांनी भारतीय शहीद मंजित सिंह यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. भारतीय तुकडी तिथं पोहचली तेव्हापर्यंत दशतवाद्यांनी तिथून काढता पाय घेतला होता. 


या कारवाईत पाकिस्तानी रेंजर्ससहीत सीमेवर तैनात बीएटी आणि पाकिस्तानी सेनेचे जवान मोठ्या संख्येत मारले गेले.