जम्मू : पाकिस्तानकडून भारतीय चौक्याना निशाणावर ठेऊन गोळीबार करण्यात आला, गेल्या नऊ दिवसातून तेरा वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानकडून गुरूवारी संध्याकाळी जम्मू काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टर जवळील सीमारेषेवर स्वयंचलित हत्यारांनी गोळीबार करण्यात आला.  या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून देखील सडेतोड उत्तर देण्यात आले. तसेच सोमवारी देखील पाकिस्तानकडून पल्लनवाला सेक्टर, राजौरीच्या सुंदरबनी तसेच नौशेरा सेक्टर आणि पुंछ जिल्हातील खादी सेक्टर जवळील सीमारेषेवर आणि भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक भारतीय सैनिक शहीद झाला आणि दोन लोक जखमी झाले आहेत. पाकिस्तानचा असा दावा आहे की या गोळीबारात भारताकडून पाकिस्तानचे सात सैनिक मारले गेले आहेत.


तसेच मंगळवारी देखील जम्मू काश्मीरच्या राजौरी नियंत्रण सीमारेषेवर चार तास भारतीय चौक्यांवर निशाणा ठेऊन मोठ्याप्रमाणात गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानला पुन्हा एकदा जबरदस्त प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
 
पाकिस्तानकडून भारतीय चौक्यांना निशाणावर ठेऊन सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.