नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एका खासगी न्यूज चॅनेलवर बोलताना म्हटलं आहे, 'राहुल गांधी हे व्यक्ती म्हणून खूपच चांगले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी मूल्यांविषयीची त्यांची जाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त चांगली आहे,' तसेच, लवकरच राहुल यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल, असं वाटतंय, असंही जयराम रमेश यांनी म्हटलंय.


जयराम रमेश पुढे म्हणाले, 'मोदी यांना तथ्ये हवी तशी वळवून सांगण्याची सवय आहे. त्यांच्यापेक्षा राहुल गांधी यांच्यामध्ये मूल्यांविषयीची जाण जास्त आहे. राहुल गांधी हे आमचे सर्वाधिक सक्रिय नेते आहेत. आता त्यांची पदोन्नतीही लवकरच होईल.' 


'लोकसभेमध्ये आमचे इतके कमी संख्याबळ यापूर्वी कधीच नव्हते. आम्ही सध्या अडचणीत आहोत,' अशी कबुली जयराम रमेश यांनी दिली आहे.