पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी अपशकुनी आहेत, त्यांनी चुकीच्या वेळी शपथ घेतल्यामुळे देशात दुष्काळ आणि जलप्रलयासारख्या आपत्ती ओढावत आहेत, अशी टीका आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. 


हाय-फाय बाबांची चौकशी करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालूंनी बुवा-बाबांचा उल्लेख हाय-फाय साधू संत असा केला आहे. या सगळ्या बाबांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. रामदेव बाबा व्यापारी आहेत, आधी ते मुलायम यांच्याची जवळीक करायचे आता मोदींबरोबर आहेत, असंही लालू म्हणाले आहेत. 


'दूध-दही खा, यादवांचे गुण गा' 


बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या दारुबंदीच्या निर्णयाचंही लालूंनी स्वागत केलं आहे. दूध-दही खा आणि यादवांचे गुण गा अशी प्रतिक्रिया लालूंनी दिली आहे.