जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये जटवाडाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याचे एका विवाहितेसोबत संबंध होते. या दोन्ही प्रेमी जोडप्यांनी ट्रेन समोर आत्महत्या केली आहे. मृतदेहजवळ असलेल्या आधारकार्डमुळे यांची ओळख पटली. दोघेही २ दिवसांपासून घरातून गायब होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यांच्याकडे एक लॅपटॉप, रोख रक्कम आणि काही दागिने होते. काही दिवसांपूर्वीच या तरुणीचं लग्न झालं होतं. या दोघांच्या संबंधाबाबत घरच्यांना माहित होतं पण त्यांचा याला विरोध होतात. तरुणीच्या घरी जेव्हा कळलं तेव्हा हे दोघेही घरातून फरार झाले.