लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी तीन टप्प्याचं मतदान झालं असून उर्वरित चार टप्प्यासाठी प्रचार सुरु आहे. मात्र याच प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. अशातच टीका करताना नेत्यांची जीभ घसरत चालल्याचंही समोर येतंय. याचं ताजं उदाहरण म्हणजे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी. पंतप्रधान नरेंद्र आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दहशतवादी म्हणून संबोधलंय.


अमित शहा, नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना आणि जनतेला धमकावून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकारल आलं तर बिहारपेक्षा वाईट अवस्था होईल, असंही राजेंद्र चौधरी म्हणालेत.  


पाहा काय म्हणाले राजेंद्र चौधरी