कोलकता: भारत माता की जय म्हणण्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. जगाला भारत माता की जय बोलायला लावायचं आहे असं मोहन भागवत म्हणाले आहेत. यासाठी संघ प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रेण्ड्स ऑफ ट्रायबल सोसायटीचे सहसंस्थापक मदनलाल अगरवाल यांच्या जीवनावरच्या पुस्तकाचं प्रकाशन मोहन भागवत यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही टीका केली. 


फाळणीनंतर पाकिस्ताननं भारत नाव न स्विकारता वेगळं नाव स्विकारलं, कारण त्यांना भारत ही संकल्पना मान्य नव्हती असं भागवत म्हणाले आहेत.