नवी दिल्ली : सीमेपलीकडून पाकिस्तानची आगळीक थांबली नाही तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल, असं वक्तव्य भारताचे नवे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला रावत यांनी मुलाखत दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत युद्धासाठी पूर्ण तयार आहे पण आम्ही नेहमीच शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आग्रही आहोत, असं रावत म्हणाले आहेत. लष्कराचं मनोबल वाढवणं आणि जवानांना सशक्त बनवण्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया रावत यांनी दिली आहे.