सहारनपूर : मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षापूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहे. मोदी सरकारने २ वर्ष पूर्ण केले आहेत याचाच लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी या रॅलीमधून देशासमोर ठेवणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींच्या सभेला लोखोंची गर्दी होते त्यामुळे सहारनपूरमध्ये जर रॅलीचं आयोजन होणार असेल तर त्यासाठी मोठी जागा देखील उपलब्ध होणं आवश्यक आहे. यासाठीच एका मुस्लीम शेतकऱ्याने त्याची ८ एकर शेतीची जागा रॅलीसाठी देणार असल्याची ऑफर दिली आहे. 


२६ मे रोजी होणाऱ्या या रॅलीसाठी जवळपास २६५ एकर जागा वापरण्यात येणार आहे. रहीस अहमद यांनी ८ एकरवर लावलेला ऊस तोडून ही जागा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी त्यांना भरपाई देखील ऑफर केली होती पण त्यांनी ही ऑफर स्विकारली नाही.