अल्वर : भारतीय जनता पक्षाचे आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी, देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांना नेहरू परिवार जबाबदार आहे, त्यांच्यामुळेच देशात बलात्कार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आहुजा नेहरू परिवारावर आरोप करताना म्हणतात, 'देशातील नेहरू आणि गांधी परिवाराचे सर्व पुतळे तोडायला हवेत. सद्दाम हुसैन यांचा पुतळा तोडल्यानंतर नागरिक पुतळ्यावर थुंकले होते. याप्रमाणेच नागरिक त्यांच्या पुतळ्यांवर थुंकतील. 


जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यामुळेच देशात समस्या निर्माण होत आहेत. शिवाय, यांच्यामुळेच भ्रष्टाचार आणि बलात्काराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. कारण, यांचे संस्कारच तसे आहेत. विजयालक्ष्मी पंडित या मुस्लिमाशी विवाह करणार होत्या, पण महात्मा गांधींमुळे हा विवाह थांबला होता.' अल्वर जिल्ह्यातील रामगढ विधानसभा मतदारसंघातून आहुजा विजयी झाले आहेत. 


आहुजा म्हणाले, ‘जेएनयू हा सेक्‍स रॅकेटचा अड्डा असल्याचे यापूर्वी म्हटले होते. हे वक्तव्य आज खरे ठरत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिव्य पुरुष आहेत. मोदीच देशातील सर्व समस्या संपवतील.'