नवी दिल्ली : उसाला जास्त पाणी लागत नसल्याचा दावा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला आहे. राज्यसभेत सुरू असलेल्या दुष्काळाच्या चर्चेत त्यांनी हा दावा केला आहे. 
सर्वच राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजनांची गरज असल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. पण त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे चर्चा रंगू लागल्या आहे.