चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 डिसेंबरला जयललिता यांचे निधन झाले. अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तामिळनाडूत जयललिता यांची ओळख अम्मा अशी होती. त्यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुकने दिलीये.


तसेच या मृतांच्या नातेवाईकांना तीन लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा अण्णाद्रमुककडून करण्यात आलीये.