श्रीनगर : देशभरात दिवाळीचा सण साजरा होत असताना सीमारेषेपलिकडून मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्रासह दोन जवान शहीद झालेत. मनदीप सिंह आणि नितीन सुभाष अशी शहीद झालेल्या जवानांनी नावे आहेत. 


कुपवाड्याच्या माछिल सेक्टरमध्ये गस्त घालत असताना पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सांगलीच्या सुपुत्राला वीरमरण आले. 


भारताने सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केल्यानंतर तब्बल 53 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेय.