नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखाने बंद करण्यात येत आहे. राज्यात सुरु असलेल्या या कारवाईमुळे वाद निर्माण झाला आहे. याला राजकीय रंग दिला जात आहे. खासदार असदुद्दीन ओवैसींनी या मुद्द्यावर भाजपवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओवैसींनी म्हटलं आहे की, भाजपचा हा खोटारडेपणा आहे. उत्तर प्रदेशात गाय त्यांची मम्मी आहे पण नॉर्थ ईस्टमध्ये ती यम्मी आहे.' भाजपने नार्थ ईस्टच्या राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये गोमांस बंदी करणार नसल्याचं म्हटलं होतं. ज्यावर ओवैसींनी टीका केली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यापासून अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करुन ते बंद केले जात आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपने हा मुद्दा उचलून धरला होता आणि जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होतं.