उधमपूर : पाकिस्तानी लष्करानं पुन्हा एकदा आपल्या नापाक वृत्तीचं दर्शन घडवलंय. सीमेवर गस्त घालत असलेल्या दोघा भारतीय जवानांची पाकिस्तानी लष्करानं निर्घृण हत्या केली. त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हत्येनंतर त्यांच्या मृतदेहांची विटंबना देखील करण्यात आलीय. भारतीय लष्करानं या हीन कृत्याबद्दल पाकिस्तानचा निषेध केलाय. याचा मुँहतोड जवाब देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.