नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या संसदीय बैठकीत भावूक झाले. भाषण करत असताना पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या खासदारांना म्हटलं की, नोटबंदीचा निर्णय हा देशहितासाठी घेतला आहे. याला सर्जिकल स्ट्राईक बोलू नका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की हा निर्णय त्यांनी गरीबांच्या हितासाठी घेतला आहे. यामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल. मोदींनी म्हटलं की, सरकाच्या या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल. याशिवाय मनी लॉंड्रिंगला देखील तपासलं जाईल. पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय देशातील गरीबांच्या हिताचा आहे.


विरोधक हे चुकीची माहिती पसरवत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपच्या खासदारांनी जनतेमधून जावून याचे फायदे सांगितले पाहिजे असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.