नवी दिल्ली : केंद्रीय ऊर्जामंत्री पियूष गोयल आपल्या नवीन योजनांची माहिती देण्यासाठी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत होते. यावेळी अचानक लाईट गेली. त्यामुळे बत्ती गुलचा सामना ऊर्जा मंत्र्यांना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऊर्जा मंत्र्यांच्या कार्यक्रमात वीज गेल्यामुळे काहीवेळ सभागृहात शांतता पसरली. पण या संधीचा फायदा घेऊन पियूष गोयल यांनी एक वैयक्तिक अनुभव सांगत वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.


ते म्हणालेत, माझ्या प्रत्येक कार्यक्रमात एकदा तरी लाईट गेली पाहिजे, असे माझ्या पत्नीला वाटते. यामुळे मला किंचितही विश्रांती न घेता किती मोठा पल्ला पार करायचा आहे, याची जाणीव होत राहील, असे तिला वाटते. तिच्या सांगण्यामुळे लाईट घालवण्याची सवयच लागली की काय, असे त्यांनी हसत म्हटले.