नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विविध पक्षांच्या 16 खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली. लोकसभेत पास करण्यात आलेलं आयकर संशधोन विधयेकाविषयी त्यांनी आपली नाराजी राष्ट्रपतींकडे व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कोणत्याही चर्चेशिवाय लोकसभेत आयकर संशोधन विधेयक बील पास करण्यात आलं. संपूर्ण देशात लोकांचा आवाज दाबण्यात येत आहे. लोकांमध्ये भीती आहे. त्यासाठीच आम्ही राष्ट्रपतीची भेट घेतली. लोकसभेच्या प्रथेनुसार कामकाज केलं जात नाही. लोकसभेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.' असं म्हणत राहुल गांधींनी सरकारवर आरोप केला.


लोकसभेत कामकाज प्रथेनुसार होत नाही आणि हीच राष्ट्रपतींना सांगण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली असं राहुल गांधी म्हणाले. मात्र यावेळी मीडियाशी बोलताना राहुल गांधी फक्त याच विषयावर बोलले.