कोलकाता : देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधानांना हटवून लालकृष्ण आडवाणींना देशाचं नेतृत्व द्या अशी मागणी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केली आहे. राजनाथ सिंग किंवा अरुण जेटलींनीही देशाचं नेतृत्व केलं तरी चालेल, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोस व्हॅली चीट फंड घोटाळ्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे दोन खासदार अटकेत आहेत. खासदारांची अटक आणि नोटबंदी या दोन्ही मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. आता तर पंतप्रधानांना हटवण्याची थेट मागणी त्यांनी केली आहे.