नवी दिल्ली: माझ्या गळ्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून ओवेसींवर जोरदार टीकाही झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जावेद अख्तर यांनी आपल्या राज्यसभेतल्या शेवटच्या भाषणामध्येही ओवेसींना याच मुद्द्यावरून लक्ष्य केलं होतं. आता जावेद अख्तर यांच्या पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनीही ओवेसींवर टीका केली आहे. भारत माता म्हणायला त्यांना त्रास होत असेल तर भारत अम्मी म्हणा, असा टोला त्यांनी लगावला आहे. 


ओवेसी यांच्या या वक्तव्याविरोधात अलाहाबाद हायकोर्ट आणि लखनऊच्या एका कोर्टामध्ये देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रामध्ये याच मुद्द्यावरून एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांचं निलंबन करण्यात आलं आहे.