नवी दिल्ली : सहकारी बँक आणि पतसंस्थावरील निर्बंध उठवण्यासंदर्भात शिवसेनेचं शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली खरी पण त्याच्या हाती कुठलंही ठोस आश्वासन आलेलं नाही.


जिल्हा बँकांना नेमकं कुठे बसवायचं याविषयी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करू असं पंतप्रधानांनी शिवसेनेच्या खासदारांना सांगितलंय. त्यामुळे जिल्हा बँकांविषयीचा तिढा कायम आहे. दरम्यान उद्या विरोधी पक्षांच्या खासदारांचं धरणं आंदोलन होणार आहे. त्यात सहभागी होण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ असं शिवसेना खासदारांनी म्हटलंय.