जयपूर : सतीरामपूर गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाच्या चितेवर उडी घेतली आणि तेथे उपस्थित सगळेच जण स्तब्ध झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण या तरुण डूंगरपूर येथून बाईकवर त्याच्या घरी निघाला होता. रेल्वे स्थानकादरम्यान त्याच्या गाडीला अपघात झाला आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याचे नातेवाईक घरी निघून गेले. सगळे जण त्यांच्या कामात व्यस्थ होते आणि नारायणची बहिण थेट समशानभूमीत पोहोचली. काहीही विचार न करता तिने भावाच्या चितेवर उडी घेतली आणि तिचाही यात मृत्यू झाला. तरुणी ही मानसिक रुग्ण असल्याचं बोललं जात आहे.