नवी दिल्ली : शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे एका गुरु-शिष्याप्रमाणे असते. गुरु-शिष्याचं नातं हे पवित्र असतं. पण या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्तीसगड मधील जशपूर जिल्ह्यातील एका शाळेत घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी विक्रम तिरके या शिक्षकावर काही गंभीर आरोप केले आहे. हा शिक्षक विद्यार्थिंनींना फळ्यावर मी तुमच्यावर प्रेम करते, मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे असं लिहिण्यास सांगत असतं. तसेच शारिरीक शोषण, अश्लिल वागणूकचे ही आरोप विद्यार्थिंनींनी या शिक्षकावर केले आहे.


या सरकारी शाळेत वर्गात दरवाजा बंद करुन हा शिक्षक विद्यार्थिंनींना मालिश करण्यासाठी देखील सांगत असल्याचा धक्कादायक खुलासा विद्यार्थिंनींनी केला आहे.