गुवाहाटी : आसामच्या कोकराझारमध्ये ग्रेनेडच्या साहाय्यानं स्फोट आणि फायरिंग घडवून आणली गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी बालजान मार्केटमध्ये झालेल्या या स्फोटात १३ लोकांचा जीव गेलाय तर ५० हून अधिक जण जखमी झालेत. 


हल्लेखोर सात - आठ जण होते... ऑटो रिक्षा घेऊ ते बाजारात घुसले. त्यांच्याकडे एके ४७ सारखे हत्यारही होते. या दहशतवाद्यांना सिक्युरिटी फोर्सेसनं दिलेल्या प्रत्यू्त्तरात एका हल्लेखोराचा मृत्यू झालाय. त्याच्याजवळ एक एके-४७ सापडलीय. तर तीन दहशतवादी फरार झालेत. 


मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच आसामच्या डीजीपींनी अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. स्थानिक दहशतवादी १५ ऑगस्टपूर्वी अशा घटना घडवून आणू शकतात, अशी माहिती त्यांच्या हाती लागली होती.