कानपूर : लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींचे सरकार सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारली की खालावली यावर लग्न बोलणीच्यावेळी चर्चा होती. पण या चर्चेतून झालेल्या वादामुळे चक्क लग्न मोडल्याची अजब घटना घडली आहे. व्यवसायिक असलेला मुलगा आणि सरकारी नोकरी करणारी मुलगी या दोघांचे लग्न ठरले होते.


लग्नातील खर्चावर चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी भेटण्याचे ठरवले होते. त्यानंतर मंदिरात ही चर्चा व्यवस्थित सुरु होती. पण भारतीय अर्थव्यवस्था हा विषय चर्चेत आला आणि सगळे फिस्कटले. सरकारी कर्मचारी असणाऱ्या मुलीने भारतीय अर्थव्यवस्था खालावण्यासाठी मोदींना जबाबदार धरले. पण मोदी समर्थक असलेल्या मुलाला हे पटले नाही, त्यामुळे दोघांमध्ये जोराचे भांडण सुरु झाले.


हे भांडण इतके मोठे झाले की दोघांनीही ठरलेले आपले लग्न मोडण्याचं निर्णय घेतला आणि आपल्या मार्गाने निघून गेले. आपण लग्न करणार नसल्याचे दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना कळवले. त्यानंतर कोणतीही बोलणी न होता दोन्ही कुटुंब आपल्या घरी निघून गेले.