गुवाहटी : आसामच्या तिनसुकियातील पेनग्रीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानावर हल्ला केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद तर 4 जवान जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवाद्यांनी आयईडीचा भूसुरुंग स्फोट घडवून आणला.  या स्फोटानंतर जवानांचा ताफा जागीच थांबला.. ही संधी साधून दहशतवाद्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंकडून बेछूट गोळीबार केला. यांत सात जवान जखमी झाले होते. यापैकी तीन जवानांना उपचारादरम्यान हौतात्म्य आलं. 


दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सुरक्षा जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवाद्यांशी अद्यापही चकमक सुरु असल्याची माहिती मिळतेय.. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्यांच्या या हल्ल्याचा निषेध केलाय. आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून परिस्थितीवर लक्ष असल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनीही दु:ख व्यक्त केले.