पणजी : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गोव्याच्या भूमीतून भाजपवर हल्लाबोल केलाय. जगातले मित्र जोडण्यापेक्षा आहेत ते मित्र टिकवा, असा सल्ला त्यांनी भाजपला दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यातल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. या सभेद्वारे त्यांनी गोवा विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय. यावेळी उद्धव यांनी पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर ही थेट हल्लाबोल केलाय. 


उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर गेलेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्त्वात गोव्यातील निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केलीये.