नवी दिल्ली : आयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मुद्द्याला केंद्रीय जल संसाधन मंत्री उमा भारती यांनी हवा दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमा भारती यांनी म्हटलं की 'राम मंदिर हा माझा आस्थेचा विषय आहे. माझा विश्वासाचा विषय आहे. मला यावर अभिमान आहे. यासाठी मला जेलमध्ये जरी जावं लागलं तरी जाईल आणि फासांवर लटकावं लागलं तरी लटकेल.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भेटीवर जेव्हा त्यांना अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माणाबाबत काय चर्चा झाली असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की, 'राम मंदिरवर आपल्याला बोलण्याची गरज नाही. याविषयात आम्ही अनोळखी नाही आहोत. योगीजींचे गुरू महंत अवैद्यनाथ राम मंदिर आंदोलनाचे पुरोधा होते.'


हे प्रकरण न्यायालयात आहे त्यामुळे जास्त नाही बोलणार. हे प्रकरण न्यायालया बाहेरही सुटू शकतं. सोबतच त्यांनी योगी आदित्यनाथ यांचं कौतूक देखील केलं.