नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे राष्ट्रीय रायफल्सचे जवान चंदू चव्हाण पाकिस्तानात आले नसल्याचा खोटा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा चंदू चव्हाण नावाचा २२ वर्षाचा जवान आपल्याकडे आल्याचं पहिल्यांदा पाकिस्तानच्या संरक्षण दलाने म्हटलं होतं. पाकिस्तानच्या संरक्षण दलाचं टवीट देखील याचा मोठा पुरावा आहे.


आज पाकिस्तानातील लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्याशी, लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंग यांनी यांनी फोनवरून बातचीत केली आणि चंदू बाबुलाल चव्हाण या भारतीय जवानाला  सोडण्याची मागणी केली. पण आमच्याकडे भारतीय लष्कराचा एकही सैनिक नसल्याचं पाकिस्ताननं म्हटले आहे. यावरून चंदू चव्हाणला परत आणणे भारतासाठी आणखी कठीण होत असल्याचं दिसून येत आहे.