मध्यप्रदेश : भिंडमधून एक असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. येथे ४ मुलांसह त्यांच्या आईची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला आटक केली आहे. पोलिसांनी हत्येमागचं कारणही शोधून काढलंय. घरात क्लास घेणाऱ्या शिक्षकांनीच या पाचही जणांची हत्या केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांच्या माहितीनुसार अंकुर दीक्षित हा युवक रीना या महिलेच्या घरी तिच्या मुलींना शिकवण्यासाठी येत होता. या दरम्यान त्यांच्यात अफेअर झालं. घटनेच्या दिवशी रीनाने फोन करुन अंकुरला त्याच्या घरी बोलावलं होतं. अंकुर त्या दिवशी झोपेच्या गोळ्या घेवून आला आणि ड्रिंकमध्ये टाकून चारही मुलाना दिली. या दरम्यानच एका मुलगा शुद्धीत आला आणि त्याने आपल्या आईला आपल्या सरसोबत विचित्र स्थितीत पाहिलं. यानंतर अंकुर आणि रीनाने या मुलाची हत्या केली. त्यानंतर दुसरी मुलं ही शुद्धीत आली आणि दोघांनी या मुलांची ही हत्या केली. 


चौथी मुलगी ही देखील शेवटी शुद्धीत आली पण रीनाने तिची हत्या करण्यास अंकुरला मनाई केली. यानंतर अंकुरने या रीना आणि त्या मुलीचीही हत्या केली आणि फरार झाला. कॉल डिटेलच्या माहितीवरुन सर्व प्रकार उघडकीस आला. यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश असल्याचं रीनाच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.