इस्लामाबाद : भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधले दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अजहर घाबरल्याचं पाहायला मिळत आहे. एवढच नाही तर पाकिस्तानी सरकारनं या दोघांना लपून बसण्याचा, तसंच काही दिवस तोंड बंद ठेवण्याचा इशारा दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले केले. या भागामध्ये हाफिज सईदनं मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प सुरु केले होते.