अटारी : पाकिस्तानने आपला नीचपणा दाखवून दिलाय. भारतीय कैदी कृपालसिंग याचे हृदय आणि जठर काढून घेतले. पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या कृपालसिंगचा मृत्यू झाला होता.


पार्थिव भारतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृपालसिंग याचे पार्थिव भारतात आले. मात्र त्याचे हृदय आणि जठर पाकिस्तानने काढून घेतल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानच्या या नीचपणाविरोधात तीव्रसंताप व्यक्त होत आहे.


बॉम्बस्फोटाचा आरोप


१९९२ साली सीमा ओलांडून कृपालसिंग पाकिस्तानात गेला. त्यावेळी त्याला अटक करून तुरुंगात कैद करण्यात आले होते. पाकिस्तानात झालेल्या बॉम्बस्फोटाचा आरोप ठेवून त्याला फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली होती. 


डॉक्टरांना धक्कादायक मिळाली माहिती


दरम्यान, कृपालसिंग याचा संशयास्पदरित्या त्याचा तुरुंगात मृत्यू झाला. कृपालसिंगचे पार्थिव भारतात आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याचे शवविच्छेदन अमृतसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी डॉक्टरांना धक्काच बसला. कारण त्याचे हृदय आणि जठरच नव्हते.