नवी दिल्ली : भारताला चीन मीडियाने धकमी दिली आहे. जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर चीनचे जवान केवळ १० तासात राजधानी दिल्लीत पोहोचतील. चीन मीडियाने आग ओकताना म्हटले आहे की, युद्ध झाले तर चीनी सैनिकांचा ताफा ४८ तासात पॅराशूटच्या माध्यमातून १० तासात दिल्लीत पोहोचतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनॅशनल स्पेक्टेटर यांच्या ट्विटनुसार, चीनने सरकारी टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून हा दावा केला आहे. चीनकडून भारताला पहिल्यांदा धमकी दिली गेली आहे. भारतातबाबद चीन मीडियाची ही बडबड कायम आहे.


दरम्यान, अॅप्पलने भारतात एक प्लांट उभारण्याचा तयारीत आहे. मात्र, चीन मीडियाने आपल्या सरकारला सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. आपली उत्पादन क्षमता वाढविली पाहिजे. या धमकीची सोशल मीडियावर याबाबत खिल्ली उडविली जात आहे.