मुंबई :  उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार याने संतापात प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हटला, बस आता खूप झाले. आता यावर प्रतिबंध घातले पाहिजे. अभिनेत्याने ट्विट केले की, जाँबाजांसाठी खऱ्या दिलाने प्रार्थना, दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. बस आता खूप झाले. जय हिंद! 



केवळ अक्षय कुमारनेच नाही तर शाहरूख खान, शेखर कपूर, रितेश देशमुख आणि अदनान सामी सारख्या अनेक बॉलीवूड ताऱ्यांनी दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे. तसेच हल्ल्यातील शहीद कुटुंबियांच्या दुखात सामील असल्याचे म्हटले आहे. तसेच हल्ल्याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे.