मुंबई : कान्स फेस्टीवलमध्ये जेव्हा ऐश्वर्या राय-बच्चन रेड कार्पेटवर उतरली तेव्हा तिचे जांभळे ओठ हे आकर्षणाचे केंद्र ठरले. त्यानंतर ऐश्वर्याने लावलेल्या या जांभळ्या लिपस्टीकची चांगलीच चर्चा रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडलाईफ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमिताभ बच्चन यावर बोलले की, 'यामध्ये चुकीचं काय आहे.'


'सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीला त्यांचं मत मांडण्याची संधी देते याआधी असं होतं नव्हतं त्यामुळे तुम्हाला माहित नसायचं की लोकं तुमच्याबाबत काय विचार करतात. पण आता तुम्हाला हे माहित पडतं. हे एक चांगलं माध्यम आहे. पण एका दिवसासाठी किंवा अर्ध्या दिवसांसाठी एखादी गोष्ट असू शकते. दुसऱ्या दिवशी आणखी काही चर्चेत येतं.