मुंबई : कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणा-या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ घेऊन गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवट कसा होणार याबाबत सर्वच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालिका संपणार असल्याची बातमी आल्यानंतर या मालिकेतील अजय आणि नेने वकील यांचे गुन्हेगार सापडल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअॅपवर चांगलाच व्हायरल होतोय. 


या मेसेजमध्ये सुशल्या आणि निलीमा वहिनी या दोघांना पोलीस घेऊन जात असल्याचे दिसत आहे. दरम्यान, हा व्हॉट्सअॅप मेसेज कितपत खरा आहे ते मालिकेच्या शेवटीच समजेल.


झी मराठीवरील वेगळ्या धाटणीची मालिका म्हणून या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. नवीन कलाकार असूनही प्रेक्षकांनी या मालिकेवर प्रेम केले. दत्ता, सुशल्या, नीलिमा वहिनी, पांडू, सरिता, अभिराम, आये, नेने वकील यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.